समिधा
आत्मशोध म्हणजे स्वत:त गुंतून पडणे नव्हे तर सर्जनशील होऊन अपूर्व निर्माण करणे. प्रत्येक कवीला याची जाणीव होत असते. त्यामुळे त्याच्या लौकिक व्यक्तिमत्वाचं रूपांतर अलौकिक व्यक्तिमत्वात नकळतपणे होत असते. कवीला आपलं व्यक्तिमत्व प्रसरणशील होत विश्वभर पसरावं असं वाटतं. ‘स्फुरत पसरली विश्वामाजी’ असं केशवसुत यामुळेच म्हणाले होते. प्रस्तुत कवयित्रीचेही हेच मनोगत आहे. ‘अंतर्यामी अनुभवलेलं नि क्षितिजापलिकडे पोहोचलेलं’ व्यक्तिमत्व संघटित व्हावं ही कवयित्रीची मनिषा आहे. प्र